कोल्हापूर – राज्य गुणवंत कामगार असोसिएशन , महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापुर येथे आयोजित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार वितरण सोहळा मध्ये प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात म्टटले की पुरस्कार्थीनी हा पुरस्कार आपले अंतिम साध्य न मानता, यापुढेही उल्लेखनीय कार्य करावे तसेच कामगार म्हणून सुरवात करताना स्वतः पुरस्कार्थी बनून न थांबता, संघटनात्मक बांधणी करून समाज अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे. पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजनाचे निमित्त साधुन सुरेश केसरकर यांनी महाराष्ट्रात एक क्रांतीपर्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कामगार वर्ग हा समाजाचा प्रमुख घटक आहे.
पुरस्कार्थीनी, यापुढेही उल्लेखनीय कार्य करावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
यावेळी त्यांच्या हस्ते प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या राजयोगिनी सुनंदा दिदी यांचा नागरी सत्कार तसेच ३९ राज्य व ३२ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराकरीता निवड झालेल्या पुरस्कार्थींना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व कोल्हापूरी फेटा देवून गौरविणेत आले.
यावेळी राजयोगीनी ब्रहमाकुमारी सुनंदा दिदीजी यांनी सत्काराला उत्तर देताना, जागतिक पातळीवर असलेली युद्धजन्य परिस्थिती, देशात वाढलेली अराजकता, कौटुंबिक कलह या सर्व समस्या मानसिक आरोग्याशी निगडीत आहेत. स्वतःला आध्यात्मिक प्रवाहात सहभागी करून मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केल्यास विश्वशांती निर्माण होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना धार्मिक, क्रिडा , सांस्कृतिक , शैक्षणिक , आरोग्यविषयक , राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनिय कार्य असल्यामुळे त्यांना सन्मानिय प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष गटनेते , विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील , राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुनंदा दिदीजी यांच्या शुभहस्ते सर्वोत्कृष्ट समजला जाणारा
“राष्ट्रीय कामगार भूषण पुरस्कार २०२४” सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व कोल्हापुरी फेटा देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला.
यावेळी सहा. कामगार आयुक्त विशाल घोडके, मॅन्यु फॅक्चरर्स असोसिएशनचे कागल – हातकणंगलेचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, राजाध्यक्ष – शिक्षक नेते भरत रसाळे, निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष , लेखक , कवी, दिग्ददर्शक , संपादक अनिल म्हमाने सर आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. मान्यवरांमध्ये राजेंद्र निकम, संभाजी पवार, सचिन खराडे आदींचा समावेश होता.स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले. आभार अनिता काळे यांनी मानले. सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबे यांनी केले.
यावेळी ३६ जिल्ह्यातील असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, विभागीय प्रतिनिधी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गुणवंत कामगार उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होणे करिता संजय सासने, संभाजी थोरात, रूपाली निकम, अनिता काळे, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, भगवान माने, सुभाष पाटील, संतराम जाधव, बाळासाहेब कांबळे, संजय गुरव, प्रविण भिके, बाजीराव हेवाळे, संदिप सुतार, सुनिल पाटील, धर्मेंद्र वंजिरे, बाजीराव हेवाळे, नारायण धनगर आदींनी विशेष परिश्रम घेतले.